पवई तलावावर बाप्पांना भावपूर्ण निरोप

गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर ! या अशा गर्जनेत, ढोल-ताशांच्या निनादात आणि आबालवृद्धांच्या उस्फुर्त उत्साहात अनेक घरगुती व सार्वजनिक गणपतीचे बुधवारी पुढच्या वर्षी लवकर येण्याचे निमंत्रण देवून भावपूर्ण आणि जड अंतकरणाने विसर्जन पवई तलावाच्या दोन्ही घाटांवर करण्यात आले.

शुक्रवारी वाजत-गाजत, ढोल-ताशांच्या गजरात आगमन झालेल्या बाप्पांनी भक्तांच्या घरी पाहुणचार घेतल्यानंतर रविवारी दीड दिवसाच्या आणि बुधवारी ५ दिवसाच्या बाप्पांनी आपल्या भक्तांचा निरोप घेतला. मुंबईत अनेक ठिकाणी कृत्रिम तलावात गणेश विसर्जन करण्यात आले. पवईमध्ये मुख्य गणेशघाट आणि गणेशनगर गणेशघाट अशा दोन ठिकाणी घरगुती गणेशांचे विसर्जन करण्यात आले.

पवईमधील अनेक रस्त्यांवर हातगाडी, टेम्पो, रिक्षा, कारमध्ये बसून बाप्पा निरोपाला निघाले. पवई आणि साकिनाका पोलिसांनी ही ठिकठिकाणी चोख बंदोबस्त ठेवत कोणताही गैरप्रकार होणार नाही याची काळजी घेतलेली होती. पवई येथील दोन्ही विसर्जन घाटावर रात्री उशीरापर्यंत अनेक छोट्या मोठ्या बाप्पांचे विसर्जन करण्यात आले.

रिद्धीसिद्धी आणि बुद्धीचा देवता बाप्पाचा मुक्काम घरात चैतन्य निर्माण करणारा ठरतो. त्याचे आगमनच जीवनातील दु:ख दूर करतो, अशी भावना विसर्जन करण्यासाठी आलेल्या अनेक गणेशभक्तांनी यावेळी व्यक्त केली.

, , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!