केटामाईन तस्करी प्रकरण: ७ आरोपी दोषी, पवईतील दोन आरोपींचा समावेश

केटामाईनच्या तस्करी प्रकरणी जळगाव जिल्हा तसेच सत्र न्यायालयात चालू असलेल्या खटल्यात न्यायालयाने १२ पैकी ७ आरोपींना दोषी ठरविले आहे. दोषी ठरवण्यात आलेल्या आरोपींमध्ये २ पवईतील आहेत तर १ विक्रोळी भागातील. ५ जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. पाठीमागील ५ वर्षांपासून जळगाव न्यायालयात हा खटला सुरू होता. दोषी आरोपींना २२ एप्रिल रोजी शिक्षा सुनावली जाणार आहे.

विकास पुरी (४८, रा. पवई, मुंबई), जी श्रीनिवास राव (५२, रा. पवई, मुंबई), वरूण कुमार तिवारी (४२, रा. विक्रोळी, मुंबई), नितीन चिंचोले (५६, रा. जळगाव), खेमा मधुकर झोपे (४७, रा. अंबरनाथ), रजनीश ठाकूर (५०, रा. सिकंदराबाद, आंध्रप्रदेश) आणि एस.एम. सेन्थीलकुमार (४०, रा. चेन्नई) अशी दोषी ठरवण्यात आलेल्या ७ आरोपींची नावे आहेत. तर गौरी प्रसाद पाल (विक्रोळी, मुंबई), नित्यानंद थेवर (धारावी, मुंबई), कांतीलाल उत्तम सोनवणे (उमाळा, जळगाव), विशाल सोमनाथ पुरी (जनकनगरी, नवी दिल्ली) आणि विलास रामचंद्र चिंचोले (जळगाव) या पाच जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

१२ डिसेंबर २०१३ रोजी मुंबईतील डायरेक्टोरेट ऑफ रेव्हेन्यु इंटेलिजन्स (डीआरआय) पथकाने जळगाव तालुक्यातील उमाळा येथील आयोसिंथेटीक या कंपनीत छापा मारला होता. यावेळी तिथे एका कारमध्ये केटामाईनच्या चार गोण्या (प्रत्येकी ४५ किलोग्रॅम वजनाच्या) डीआरआय पथकाला मिळून आल्यानंतर धुळे येथे एका हॉटेलमध्ये छापा मारुन वरुण तिवारी याला ताब्यात घेण्यात आले होते. धुळ्यातून देखील एक चारचाकी जप्त केली होती ज्यात केटामाईन मिळून आले होते.

रात्रभर चाललेल्या छाप्यामध्ये एकूण एक हजार १७५ किलो केटामाईन या पथकाने जप्त केले होते. यानंतर पोलिसांनी चौकशी करत असताना एकूण १२ संशयितांना अटक केली होती.

३ सप्टेंबर २०१६ रोजी जळगाव जिल्हा आणि सत्र न्यायालयात या प्रकरणी दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. खटल्यात एकूण ४४ साक्षीदार तपासण्यात आले. सुनावणीअंती न्यायालयाने ७ आरोपींना दोषी ठरवले. त्यांना २२ एप्रिल रोजी शिक्षा सुनावण्यात येणार आहे.

, , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!