भररस्त्यात चाकूहल्ला करून चोरी करणाऱ्या टोळीला पवई पोलिसांनी ठोकल्या बेड्या

पवईत दोन जणांवर भररस्त्यात चाकूहल्ला करून, चोरी करून पळून गेलेल्या तिघांच्या टोळीला पवई पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केली आहे. अश्रफ ऊर्फ सोनू अमीन शेख, स्वॅलेन ऊर्फ सोहेल शाहनवाज चौधरी आणि फैजान मन्नान सय्यद अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तिघांनाही न्यायालयाने १६ तारखेपर्यंत (शुक्रवार) पोलिस कोठडी सुनावली आहे.

पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार मुले सायकल खरेदी करण्यासाठी शनिवारी पवईतील तुंगागाव येथे आले होते. येथील एका एटीएममधून आठ हजार रुपये काढल्यानंतर ते मोबाईलवर बोलत जवळच असणाऱ्या बस थांब्याजवळ आले. यावेळी तिघांनी त्यांना घेरून त्यांच्याजवळ असणारे पैसे हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला.

तक्रारदाराने विरोध करताच तिघांनी त्यांना मारहाण करत त्यांच्याजवळील पैसे हिसकावून घेतले. एकाने त्यांच्या पाठीवर चाकूने वार केला. आरडाओरडा केल्यानंतर ते तिघे तिथून पळून गेले. पळून जाताना आवाज ऐकून मदतीला आलेल्या एका व्यक्तीला सुद्धा मारहाण करून त्याच्याजवळील मोबाईल फोन व दोन हजार रुपये लुटून नेले.

या संदर्भात पवई पोलिसांच्या विशेष पथकाने शिताफीने तपास करत अश्रफ, सोहेल, फैयाज यांना गुन्ह्यात अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरून नेलेला मोबाईल सुद्धा पोलिसांनी हस्तगत केला आहे.

, , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!