प्रमोद चव्हाण
![गौरी-गणपती विसर्जन 5th day 1](https://i0.wp.com/avartanpowai.info/wp-content/uploads/2015/09/5th-day-1-100x100.jpg)
प्रमोद चव्हाण
मुंबईमध्ये रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास अचानक ढगांच्या गडगडाट आणि वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. मुसळधार पावसामुळे हवेत बराच गारवा निर्माण झाला होता. पवई भागात वाऱ्यासह कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे ईडन इमारत परिसरात उभे असणारे एक झाड उन्मळून पडले. लागूनच असणाऱ्या सुरक्षा भिंतीवर हे झाड पडल्याने सुदैवाने कोणत्याही प्रकारचे मोठे नुकसान झाले नाही. पावसाने दडी मारल्याने राज्यावर दुष्काळाचा डोंगर […]
गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या अशा गर्जनेत, ढोल-ताशे, डीजे व बेन्जोच्या निनादात आणि आबालवृद्धांच्या उस्फुर्त उत्साहात, दीड दिवसाच्या अनेक घरगुती व सार्वजनिक गणपतीचे शुक्रवारी पुढच्या वर्षी लवकर येण्याचे निमंत्रण देवून भावपूर्ण आणि जड अंतकरणाने विसर्जन पवई तलावाच्या दोन्ही घाटांवर करण्यात आले. गुरुवारी वाजत-गाजत, ढोल-ताशांच्या गजरात आगमन झालेल्या बाप्पांनी, दीड दिवसाचा पाहुणचार घेतल्यानंतर शुक्रवारी […]
आमचा सन्मान आम्हास दया या मागणीसाठी पवईमधून संघटीत होण्यास सुरुवात झालेल्या मुंबई माजी-सैनिक असोसिएशनच्यावतीने ठाणे येथे ‘स्वाभिमान रॅलीचे’ आयोजन करण्यात आले होते. यामध्ये मोठ्या संख्येने मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातील माजी-सैनिकांनी सहभाग घेवून दिल्लीमध्ये होत असलेल्या लढाईत आम्ही सुद्धा सोबत असल्याचा संदेश दिला. महिन्यातून किमान एकदा एकत्रित येऊन आपण सरकारला आपली ताकद दाखवून देवू, असा प्रण […]
आयआयटी येथील विविध भागात कचऱ्याचे साम्राज्य पसरत असल्याची दखल घेत विभाग क्रमांक ११५ चे नगरसेवक चंदन शर्मा यांनी हातात झाडू घेत परिसरात स्वच्छता मोहीम राबवली. सोबतच लोकांना आपला परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रोत्साहन दिले. ओल्ड पवई म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आयआयटी परिसरात अजूनही हजारो कुटुंबे झोपडपट्टी भागात राहतात. अजून पर्यंत छोट्या छोट्या सुविधा सुद्धा यापैकी बऱ्याच भागात […]
पोउनि समीर मुजावर व टिमची वाहन चोरीच्या गुन्ह्यातील या वर्षीची मुंबईतील सर्वात मोठ्या गुन्ह्याची उकल पवई भागातून मोटरसायकल चोरी करून विकणाऱ्या नासीर सद्दान खान (४८) या सराईत गुन्हेगाराला पवई पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने अटक केली आहे. त्याच्याकडून आतापर्यंत ३२ एक्टिवा मोटरसायकल व ६ कार पोलिसांनी हस्तगत करत, मुंबईतील सर्वात मोठ्या वाहन चोरीच्या गुन्ह्याची उकल केली […]
परिवर्तनवादी विचारवंत मा. प्रबोधनकार ठाकरे यांच्या १३० व्या जयंती निमित्त आयआयटी, पवई येथे धम्मदिप सोशल ॲण्ड कल्चरल असोसिएशनच्या वतीने वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दि. १७ सप्टेंबर २०१५ रोजी संध्याकाळी ४ ते ८ या वेळेत पवईतील तिरंदाज महानगरपालिका शाळेत ‘प्रबोधनकार ठाकरे आणि परिवर्तनवादी विचार’ या विषयावर ही वक्तृत्व स्पर्धा होणार आहे. पवईतील जनतेसाठी शैक्षणिक […]
चांदिवली गावाची मानाची हंडी – श्री साई गणेश मित्र मंडळ यांच्यावतीने अण्णाभाऊ साठे चौक, संघर्ष नगर येथे हंडीचे आयोजन करण्यात आले होते. खासदार पूनम महाजन यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.
दिर्घ आजारावर उपचार चालू असून, त्रास असह्य होत असल्याने, हिरानंदानी येथील मार्बल यार्डमध्ये काम करणाऱ्या एका कामगाराने इलेक्ट्रिसिटीच्या वायरने झाडाच्या फांदीला गळफास लावून आत्महत्या केली आहे. पिडीत व्यक्तीचे नाव श्रीकांत नंदकिशोर प्रसाद (३५) असे असून तो बिहारचा रहिवाशी आहे. याबाबत पवई पोलिसांनी अपमृत्यूची नोंद करून त्याचे राजावाडी येथे शवविच्छेदन केले असता त्याने आत्महत्या केल्याचे स्पष्ट […]
चालत्या बसमधून लोकांचे मोबाईल फोन, पाकीट चोरून पसार होणाऱ्या चोराच्या मुसक्या आवळण्यात पवई पोलिसांना यश आले आहे. अटक आरोपीचे नाव इजाज शेख (३८) असे असून, तो गोवंडी येथील रहिवाशी आहे. त्याच्याकडून पवई पोलिसांनी दोन महागडे मोबाईल फोन हस्तगत करून त्याला तुरुंगाची हवा दाखवत असे गुन्हे करणारांना एक जरब बसवलेली आहे. जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडच्या निर्मितीमुळे पूर्व […]
दहीहंडी (गोपाळकाला) उत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. माखनचोरच्या या परंपरेत लहानथोर अशी सर्व मंडळी मोठ्या उत्साहाने भाग घेत या दिवशी ठिकठिकाणी हंडी फोडण्यासाठी निघतात. थरावर थर रचत मानवी मनोरे तयार करून हंडी फोडण्याचा एक वेगळाच थरार या दिवशी अनुभवयाला मिळतो. त्यासाठी प्रशिक्षण आणि सराव अशा दोन्ही गोष्टीची सांगड घालत ही पथके प्रत्येकवर्षी जास्तीत जास्त […]
गेली अनेक वर्ष पर्यायी मार्गासाठी लढणाऱ्या रहेजाकरांना त्यांचा हक्काचा पर्यायी मार्ग अखेर खुला झाला आहे. शुक्रवारी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे मुंबई अध्यक्ष सचिन भाऊ आहिर यांच्या हस्ते रहेजा विहार ते साकीविहार रोड हा पर्यायी मार्ग रहेजाकरांसाठी खुला करण्यात आला आहे. कुर्ला तालुका अध्यक्ष शरद पवार, स्थानिक नगरसेविका सविता पवार, महानगरपालिका अधिकारी आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे पदाधिकारी […]
सा किनाका येथील व्यापाऱ्याचे अपहरण करून, त्यास बेदम चोप देऊन, लुटून पसार झालेल्या २ चोरट्यांना पकडण्यात बीकेसी पोलिसांना यश आले आहे. अपहरण आणि जबरी चोरीच्या गुन्ह्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल करत त्यांना अटक करण्यात आली असून, ते सध्या पोलीस कोठडीची हवा खात आहेत. साकिनाका येथील कपडे व्यापारी राजकरन यादव यांचे अपहरण करून, त्यांना निर्जन स्थळी घेऊन जावून […]
माझ्या प्रत्येक कृतीतून मला फायदा कसा होईल, या विचाराने वागणाऱ्या समाजात. आपल्याला प्रत्येक कार्यात मदत करणाऱ्या, गरीब आणि गरजू अशा घरकाम करणाऱ्या स्त्रिया, त्यांचा परिवार, अनाथ, रस्त्यांवर राहणाऱ्या लोकांसाठी मोफत शिक्षण, वैद्यकीय सुविधा देण्याचे काम, पवईमधील रहेजा येथील सुकृतः ही संस्था करत आहे. एवढ्यावरच न थांबता ही संस्था, या लोकांसाठी चांगले काहीतरी करा म्हणून लोकांना […]
भारत देश आज चंद्रावर पोहचला आहे, तो केवळ तंत्रज्ञान आणि विज्ञानाच्या जोरावर. भारताने शिक्षणाच्या आणि विद्वतेच्या बळावर अनेक अशक्य गोष्टी शक्य करून दाखवलेल्या आहेत. परंतु मुंबईचे हृदय समजले जाणाऱ्या पवई, जिथे देशाचे भविष्य घडवणारे घडवले जातात अशी आयआयटी सारखी शैक्षणिक संस्था आहे, तिथेच असाही एक परिसर आहे जिथल्या मुलांना विज्ञान तंत्रज्ञान तर दूरच, शिक्षणापासूनच दूर […]
पवईची वाढती लोकप्रियता आणि पर्यटन स्थळ म्हणून मुंबईकरांचा ओढा पाहता मरीन ड्राईव्ह येथील क्वीन नेक्लेसच्या धर्तीवर करोडो रुपये खर्च करून पवई तलाव परिसरात सुशोभिकरण करण्यात आले आहे, परंतु जवळपास एक महिन्यापासून या सुशोभिकरण करण्यात आलेल्या परिसरात बनवलेल्या पदपथावरील दिवेच बंद पडलेले आहेत. त्यामुळे पवईच्या राणीचा नेकलेस चोरीला गेली कि काय असा प्रश्न आता मुंबईकरांना पडलेला […]
हिरानंदानीतील गलेरिया शॉपिंग मॉलमधील काही दुकानदारांनी आपल्या दुकानात व समोरील मोकळ्या जागेत बदल करून आपली दुकाने वाढवल्यामुळे मॉलची दुर्दशा झाली आहे. स्थानिक नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्यामुळे आता ते या मॉलकडे दुर्लक्ष करून आसपासच्या परिसरात असणाऱ्या मॉल्समध्ये खरेदीसाठी जाणे पसंत करत आहेत. या बद्दल राष्ट्रवादीचे युवा संघटनेचे उपाध्यक्ष सुधीर सिंग यांनी पालिकेकडे तक्रार केली […]
आयआयटीमधील रमाबाई आंबेडकर नगर परिसरात, गेली अनेक दिवस बांधकाम व्यावसायिक आणि कामगार, यांनी उरलेला मलबा टाकून परिसरात घाण पसरवली होती. कचऱ्यामुळे स्थानिकांना येणे जाणे तर मुश्कील झालेच होते; परंतु आजार पसरून परिसरातील लहान मुले आणि जेष्ठ नागरिक जुलाब, ताप या सारख्या आजाराने त्रस्त झाले आहेत. याबाबत निवडून दिलेले प्रतिनिधी आणि महानगरपालिका प्रशासनाला तक्रारी करून सुद्धा, […]
पवई, आयआयटी परिसरातील रमाबाई आंबेडकर नगर परिसरात गेली अनेक दिवस बांधकाम व्यावसायिक आणि कामगार मलबा टाकून परिसरात घाण पसरवत आहेत. या कचऱ्यामुळे स्थानिकांना येणे जाणे मुश्कील झाले असून, परिसरातील लहान मुले आणि जेष्ठ नागरिक जुलाब, ताप या सारख्या आजाराने त्रस्त आहेत. याबाबत निवडून दिलेले प्रतिनिधी आणि महानगरपालिका प्रशासनाला तक्रारी करून सुद्धा, त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारची ठोस […]