संरक्षक भिंतीचा प्रश्न म्हाडा आणि पालिका प्रशासनाच्या फेऱ्यात

@ रविराज शिंदे

Security-wall-IITयआयटी पवई येथील टेकडी भागातील वस्त्यांमध्ये संरक्षक भिंत कोसळण्याच्या घटना वारंवार घडत आहेत, ज्यामुळे येथील स्थानिक रहिवाशांना नाहक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. जुनाट झालेल्या या संरक्षक भिंतींची डागडुजी करण्यात यावी तसेच काही भागात नवीन संरक्षक भिंत उभारावी अशी  मागणी युथ पॉवर संघटने तर्फे करण्यात आली होती. मात्र याची जबाबदारी चक्क एकमेकांवर ढकलत महानगरपालिका आणि म्हाडा यांनी हात झटकले आहेत.

पावसाळा सुरु होताच पवईतील मोरारजीनगर, रमाबाई आंबेडकर ग्रुप नं २, शिवनेरी हिल, देवीनगर, गरीबनगर, इंदिरानगर, गौतमनगर, हरीओमनगर, स्वामीनारायणनगर या भागातील जुनाट आणि कमकुवत झालेली संरक्षक भिंत रहदारीच्या मार्गावर कोसळण्याचे सत्र मागील काही वर्षांपासून सुरुच आहे. एकमेव रहदारीचा मार्ग असल्याने संपूर्ण पावसाळयात लोक जीव मुठीत घेऊन या मार्गावरून प्रवास करत असतात.

या गंभीर प्रश्नासंबंधी युथ पॉवर संघटनेतर्फे मागील एक वर्षापासून संरक्षक भिंत बांधकाम आणि डागडुजीसाठी महानगरपालिका आणि म्हाडा या दोन्ही प्रशासनाकडे सततचा पाठपुरावा केला जात आहे. यानंतर पालिका आणि म्हाडा अधिकाऱ्यांनी भेट देवून परिस्थितीची पाहणी केली होती. वर्षभरानंतरही काहीच पाऊले उचलली जात नसल्याने दोन्ही प्रशासनाला केलेल्या पाठपुराव्यात धक्कादायक माहिती त्यांच्याकडून देण्यात आलेल्या आहेत.

“भिंतीची उंची ही ९ मीटर पेक्षा जास्त असल्याने ती आमच्या कार्यालयाच्या कक्षेत येत नाही, असे म्हाडा प्रशासनाचे म्हणणे आहे. तर संरक्षक भिंतीचे काम करणे पालिकेच्या अखत्यारीत येत नाही, याबाबत म्हाडाला त्वरित भिंत बांधावी असे पत्र दिले असल्याचा जवाब देण्यात येत आहे. दोन्ही प्रशासन एकमेकांकडे जबाबदारी ढकलत नागरिकांच्या जीवाशी खेळत आहे” असे आवर्तन पवईशी बोलताना युथ पॉवर संघटनेचे मुंबई अध्यक्ष विरेंद्र धिवार यांनी सांगितले.

या जीवघेण्या संरक्षक भिंतीचा प्रश्न नक्की कोण मार्गी लावणार? हा प्रश्न आता नागरिकांच्या मनात घोळत आहे.

आमचे फेसबुक पेज लाईक करण्यासाठी इथे क्लीक करा

 

, , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!