पवईतील आयआयटी मार्केट गेट समोरील माता रमाबाई आंबेडकर नगर ग्रुप नंबर २ येथे पालिकेतर्फे ठेवण्यात आलेली कचराकुंडी संपूर्ण भरून कचरा रस्त्यावर पोहचला आहे. यामुळे नागरिकांना घाण दुर्गंधी सारखे त्रास होत असतानाही पालिकेने याकडे मात्र पूर्ण दुर्लक्ष केले असल्याचे समोर येत आहे. थोडी विश्रांती घेतलेल्या पावसाने कालपासून पुन्हा हजेरी लावली आहे. या पावसामुळे ठिकठिकाणी साचून राहिलेली […]

