बातम्यांच्या अपडेटसाठी आमच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि टि्वटरवर आम्हाला फॉलो करा
बातम्यांच्या अपडेटसाठी आमच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि टि्वटरवर आम्हाला फॉलो करा
@प्रतिक कांबळे – दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव बघता महाराष्ट्र शासनाने घेतलेल्या निर्णयाच्या समर्थनात जनजागृतीसाठी पवईतील समाजसेवक विलास कुशेर यांनी अनोखी शक्कल लढवली आहे. त्यांनी पवई परिसरातील प्रमुख दोन रस्त्यांवर ‘गो कोरोना’ आणि ‘मीच माझा रक्षक’ असा संदेश लिहीत लोकांमध्ये याबाबत जनजागृती केली आहे. ‘महाराष्ट्र शासनाने लॉकआउटचा निर्णय घेत नागरिकांना घरी बसण्याच्या सूचना केल्या […]
आयआयटी मुंबईत काम करणारे हाऊसकिपिंग कामगार सहीत अन्य विभागात काम करणाऱ्या काही लोकांकडून पवईत या कॅम्पसमध्ये ४० रूग्ण आणण्यात आल्याची माहिती सांगितली जात आहे. आमची ड्युटी तिथेच आहे असं ‘डंके की चोट पर’ सांगितले जात आहे. यामुळे आसपासच्या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, या संदर्भात आयआयटी मुंबई जनसंपर्क अधिकाऱ्यांशी संपर्क साधून माहिती विचारली असता […]
पवईतील दोन ठिकाणी सी कॅटेगरीमधील बाहेरून येणाऱ्या प्रवाशांच्या विलगीकरणासाठी केंद्र उभी करण्याची लगबग सुरु होती. आयआयटी पवई आणि रहेजा विहार येथील प्रशिक्षण केंद्रात हे विलगीकरण कक्ष बनवण्यात येणार होते. मात्र ही लगबग सुरु असतानाच आयआयटी मुंबईच्या पवई येथील कॅम्पसमध्ये बनवण्यात येणारे विलगीकरण केंद्र शासनातर्फे रद्द करण्यात आल्याचे तहसीलदार मिलिंद बोरीकर यांनी स्पष्ट केले आहे. जगभर […]
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची संपूर्ण महाराष्ट्रात जमावबंदीची घोषणा. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्रात आज (रविवारी २२ मार्च २०२०) मध्यरात्रीपासून नागरी भागात जमावबंदी लागू करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यासंदर्भात घोषणा केली. #powai #जनता_कर्फ्यू #युद्ध_कोरोनाशी #CMMaharashtra #पवई
जगभरात हाहाकार माजवणाऱ्या कोरोना वायरसचा फैलाव जास्त प्रमाणात गर्दीच्या ठिकाणी होत असल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवार २२ मार्चला ‘जनता कर्फ्यु’ची घोषणा करत जनतेला घरातच राहण्याची विनंती केली. या जनता कर्फ्युला पवईमध्ये नागरिकांनी घरात राहत मोठा प्रतिसाद दिला आहे. पंतप्रधानांनी दिलेल्या हाकेला साथ देत पवई, चांदिवलीतील रहिवाशांनी घरातच राहण्याचा मार्ग निवडत याला मोठा प्रतिसाद दिला […]
@रविराज शिंदे पवई जेवीएलआरवरील गणेशनगर गणेशघाट येथे गांधीनगरच्या दिशेने जाणाऱ्या एका मोटारसायकलला अचानक भीषण आग लागल्याची घटना शुक्रवार, २० मार्च रोजी सकाळी ६.३० वाजता घडली. सुदैवाने चालक बचावला असून, मोटारसायकल जळून खाक झाली आहे. या संदर्भात पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रशांत झाल्टे नामक तरुण आपली यामाहा मोटारसायकल क्रमांक एमएच ०३ डीजे ३११५ वरून गांधीनगरच्या दिशेने […]
जगभर धुमाकूळ घातलेल्या कोरोना व्हायरसने (कोव्हीड १९) भारतात प्रवेश केला आहे. भारतात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या १६६च्या वर गेली आहे. तर महाराष्ट्रातील विविध ठिकाणी मिळून सध्या ४८ पॉजीटिव्ह रुग्ण मिळून आले आहेत. दुसऱ्या टप्प्यात पोहचलेल्या या व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासनाने सुद्धा ठोस पाऊले उचलली असून, ठिकठिकाणी बाहेरून येणाऱ्या प्रवाशांच्या विलगीकरणासाठी सेंटर उभी करण्याची लगबग सुरु […]
चौकशी दरम्यान पोलिसांनी त्यांना भारतीय नागरिक असल्याचे दर्शविणारी कागदपत्रे दाखविण्यास सांगण्यात आले मात्र ते तसे करण्यास अक्षम ठरले त्यानंतर त्या बांग्लादेशींना अटक करण्यात आली. मरोळ आणि सहार परिसरात बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या २ बांग्लादेशींना साकीनाका पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींपैकी एक जण मरोळ, चिमटपाडा येथे राहत होता आणि टेलर म्हणून काम करीत होता. तर त्याचा मामा […]
कौटुंबिक वादातून जन्मदात्या पित्यानेच आपल्या पोलीस शिपाई असणाऱ्या मुलाचा खून केल्याची धक्कादायक घटना १६ मार्चला पवई येथील गणेशनगर परिसरात घडली. हरिष गलांडे (४०) असे या मुलाचे नाव असून, घटनेनंतर पवई पोलिसांनी आरोपी वडील गुलाब गलांडे यांना अटक केली आहे. न्यायालयात हजर केले असता त्यांना पुढील चौकशीसाठी २० मार्च पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. या […]
देशभरात फोफावलेल्या कोरोना व्हायरस ने मुंबईत प्रवेश करत एका बाधिताचे प्राण घेतल्यामुळे मुंबईत नागरिक या व्हायरसमुळे भयभीत झाले आहेत. त्यातच भर म्हणून काल पालिका एस विभागाच्या हद्दीत एक रुग्ण सापडल्यामुळे या विभागातील नागरिक चांगलेच धास्तावले आहेत. यासंदर्भात नागरिकांनी घाबरू नये, योग्य ती काळजी कशी घ्यावी? याबाबत पवईतील सजग जागृत तरुणांनी पुढे येत आज (मंगळवार १७ […]
पवई तलावाचा कायापालट ‘सांघिक पर्यावरणीय जबाबदारी’च्या (कॉर्पोरेट एन्व्हायर्नमेंटल रिस्पॉन्सिबिलीटी- सीईआर) माध्यमातून करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय पालिका आयुक्तांच्या उपस्थित झालेल्या विशेष बैठकीत घेण्यात आला आहे. अद्ययावत तंत्रज्ञानाच्या मदतीने पवई तलावाचा विकास, मुलुंड ते पवई भागात मियावाकी पद्धतीने वनीकरण,झोपडपट्टी सुधारणा, करोनाविषयी जनजागृतीसाठी चित्रफित, विद्यार्थ्यांना संगणक आणि त्यासाठी आवश्यक प्रशिक्षक शिक्षक आदी विविध प्रकल्पांचा यात समावेश आहे. हे प्रकल्प […]
जगभरात धुमाकूळ घातलेल्या कोरोना वायरसचा फटका आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईला ही बसला असून, दिवसेंदिवस मुंबईतील बाधितांची संख्या वाढताना दिसत आहे. मुंबई पूर्व उपनगरातील बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या भांडूप ‘एस विभाग’ हद्दीत असणाऱ्या उच्चभ्रू वस्तीत राहणारी ४४ वर्षीय महिला कोरोना बाधित असल्याचे सोमवारी (१६ मार्च) रोजी चाचणीत समोर आले आहे. “महिला ही १३ मार्च दरम्यान लिसवान, पोर्तुगल […]
माणूसकी फाऊंडेशन पवईच्यावतीने ‘माझं पवई मी स्वछ ठेवणार’ या विचाराला घेऊन पवई तलाव आणि परिसरातील गार्डनमध्ये स्वछता मोहीम राबवण्यात आली. माणूसकी फाऊंडेशन चे पवई विभागाचे प्रतिनिधी रोशन पुजारी यांच्या आयोजनाखाली होळी आणि धुलीवंदनच्या दिवशी हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. या स्वछता मोहीम उपक्रमात गौतमनगर येथील लहान मुलांनी उत्स्फूर्तपणे आपला सहभाग नोंदवला होता. संस्थेचे ५ […]
पवई पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक महिला बेपत्ता झाल्याची तक्रार ऑगस्ट २०१९ रोजी दाखल झाली होती. याचा तपास सुरु असताना ८ महिन्यानंतर ही महिला हरवली नसून, महिलेचा खून झाला असल्याचे समोर येताच, पवई पोलिसांनी तिचा पूर्व पती आणि त्याच्या एका साथीदाराला अटक केली आहे. निसार सिकुर शेख (३२) आणि धुवचंद्र उर्फ लल्लन तिवारी (३४) अशी अटक […]
सर्वोत्कृष्ट विद्यापीठांच्या जागतिक क्रमवारीत इंजिनिअरिंग एंड टेक्नोलॉजी विभागात पवईतील आयआयटी मुंबई ने ‘टॉप ५०’मध्ये स्थान पटकावले आहे. याच क्रमवारीत आयआयटी मुंबई ने देशात पहिला क्रमांक पटकावला आहे. क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग नुकतीच घोषित करण्यात आली आहे. यात इंजिनिअरिंग एंड टेक्नोलॉजी वर्गात पवई येथे असणाऱ्या आयआयटी मुंबईने जगात ४४वा क्रमांक पटकावला आहे. अमेरिकेतील मॅसॅच्युसेटस इन्स्टीट्युट ऑफ […]
कोकण मराठी साहित्य परिषदेतर्फे (कोमसाप) साहित्यकांना देण्यात येणारे विविध विभागातील वाड्.मयीन पुरस्कार नुकतेच जाहीर झाले. यंदाचा प्रतिष्ठीत ‘प्रभाकर पाध्ये स्मृती पुरस्कार’ पवईकर आणि विविध भाषेतील पुस्तकांचे परीक्षण लेखक आणि कादंबरीकार विवेक गोविलकर यांच्या ‘हा ग्रंथ सागरू येव्हडा’ या पुस्तकाला देण्यात आला आहे. यावेळी कवियत्री प्रज्ञा पवार यांना ‘कविता राजधानी’, तर कादंबरी विभागात ‘र. वा. दिघे […]
@रविराज शिंदे पवईतील महात्मा फूले नगरातील शौचालयाची दयनीय अवस्था झाल्याचे पालिका ‘एस’ विभागाला वेळोवेळी कळवूनसुद्धा ते याकडे दुर्लक्ष करत असल्याने स्थानिक तरुणांनी हातात झाडू घेत या शौचालयाची स्वच्छता केली. यामुळे त्रस्त रहिवाशांना दिलासा मिळाला असून, टाळाटाळ करणाऱ्या पालिकेला आणि जनप्रतिनिधींना सणसणीत चपराक मारली आहे. पवईतील आयआयटी भागाला लागून असणारा फूलेनगर परिसर हा असंख्य झोपड्या […]
