पोलीस असल्याची बतावणी करून वृद्धाचे दागिने पळवले; हिरानंदानीतील घटना
आपले काम संपवून घरी परतत असणाऱ्या ७६ वर्षीय वृद्धाला पोलीस असल्याची बतावणी करून त्यांच्याजवळील सोन्याचे दागिने भामट्यांनी पळवल्याची घटना मंगळवारी पवईतील हिरानंदानी भागात घडली. याबाबत पवई पोलिसांनी गुन्हा नोंद करून सिसिटीव्हीच्या आधारे तपास सुरु केला आहे. यासंदर्भात पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पवईतील विजयविहार इमारतीत राहणारे विलास बांदेकर (७६) मंगळवारी सकाळी हिरानंदानी येथील आपल्या बँकेच्या शाखेत […]
पालिकेच्या वेळकाढू धोरणाने त्रस्त पवईकरांनी दगडे रचून बनविला येण्या-जाण्याचा रस्ता
@अविनाश हजारे @रमेश कांबळे पवईच्या जयभिमनगर, गौतमनगर येथे मिठी नदीवर नागरिकांच्या रहदारीसाठी असलेला पादचारी पूल पालिकेने दुरुस्तीसाठी काही आठवड्यांपूर्वी तोडला आहे. अनेक आठवडे उलटून सुद्धा ब्रिजचे काम सुरु होत नसून, पालिकेला वारंवार पाठपुरावा करून सुद्धा काहीच पाऊले उचलली जात नाहीत. या सर्व खटाटोपानी कंटाळलेल्या या परिसरातील त्रस्त नागरिकांनी अखेर स्वतः पुढाकार घेऊन रविवारी अक्षरशः दगडे […]
हॉटेल व्यावसायीकाला खंडणी मागणाऱ्या सराईत गुन्हेगारास अटक
पवईतील एका हॉटेल मालकाला खंडणी मागत जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या सराईत गुन्हेगाराला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा कक्ष १० ने बेड्या ठोकल्या आहेत. सचिन उर्फ बाबू मोहिते (३७) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरोधात खंडणी, मारहाण सह दंगलीच्या गुन्ह्यांची नोंद आहे. शनिवारी २५ मे रोजी पवई पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या एका हॉटेलच्या मालकाला मोहिते […]
कौटुंबिक वादातून नहारमध्ये ५५ वर्षीय इसमाची गोळ्या घालून हत्या
चांदिवली, नहार अम्रित शक्ती येथे राहणारे ५५ वर्षीय इसम इबनी हसन यांची गोळ्या घालून हत्या केल्याची घटना आज दुपारी १२.२० वाजण्याच्या सुमारास नहार कॉम्प्लेक्स, गेट क्रमांक ७ जवळ घडली. कौटुंबिक वादातून त्यांच्या जवळच्या नातेवाईकाने ही हत्या केल्याची प्रथमदर्शनी समोर येत आहे. हत्येनंतर आरोपी नातेवाईकाने साकीनाका पोलीस ठाण्यात हजर होत आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. इमाम उद्दीन […]
चांदिवलीतील समस्यांसाठी पालिका सहाय्यक आयुक्तांना चांदिवलीकरांचे तक्रारपत्र
चांदिवली परिसरात पालिकेशी निगडीत असणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी चांदिवली सिटीझन वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने सोमवारी पालिका ‘एल’ विभागाचे सहाय्यक आयुक्त मनिष वळुंज यांना समस्यांचे पत्र देण्यात आले. त्यांनी यावेळी लवकरच त्यांच्या या समस्यांचा अभ्यास करत कारवाईचे आश्वासन दिले. जवळपास ३.५ लाखाची लोकसंख्या असणाऱ्या चांदिवली परिसरात पाठीमागील काही वर्षात झपाट्याने वाढ झाली आहे. मात्र, शहर नियोजनात मात्र […]
देशातील पहिली मायक्रोप्रोसेसर चिप ‘अजित’ आयआयटी मुंबईने बनवली
पाश्चिमात्य आणि चीन देशाची मक्तेदारी असणाऱ्या मायक्रोप्रोसेसरवर आता भारताने सुद्धा नाव कोरले असून, देशातील पहिली ‘अजित’ ही मायक्रोप्रोसेसर चिप आयआयटी मुंबईने तयार केली आहे. या मायक्रोप्रोसेसरची रचना, आराखडा आणि उत्पादन संपूर्ण काम भारतात करण्यात आले आहे. पुढील वर्षापर्यंत इलेक्ट्रॉनिक्स बाजारपेठेची उलाढाल सुमारे ४०० अब्जांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांच्या वाढत्या मागणीमुळे इलेक्ट्रॉनिक्स बाजारपेठेत झपाट्याने वाढ […]
एस एम शेट्टी रोडच्या कामाची सुरवात, वाहतूक वळवली; वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मार्गाचा वापर टाळावा
शिवभगतानी मार्गे चांदिवली आणि हिरानंदानीला जोडणाऱ्या एसएमशेट्टी शाळा मार्गावर काल, शनिवारपासून रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली असून, या मार्गाने हिरानंदानीकडे जाणारी वाहतूक म्हाडा, प्रथमेश कॉम्प्लेक्स मार्गे हिरानंदानीकडे वळवण्यात आली आहे. या मार्ग बदलामुळे या निमुळत्या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. काम वेळेत आणि चांगल्या पद्दतीने होण्यासोबतच या मार्गावर होणाऱ्या वाहतूक कोंडीला रोखण्यासाठी आवश्यकता […]
मेट्रो – ६ प्रकल्पावर एमएमआरडीएने विचारला मुंबईकरांचा सल्ला; सामाजिक कार्यकर्ते नाराज
बांधकामाला सुरुवात करून ६ महिन्यांनंतर लोकांचा सल्ला मागणे म्हणजे कागदपत्रांची पूर्ततेची औपचारिकता – सामाजिक कार्यकर्ते लोखंडवाला – विक्रोळी या भागात बनवण्यात येणाऱ्या मेट्रो – ६ प्रकल्पाच्या कॉरिडोरच्या निर्मिती कामाच्या सुरू करण्याच्या जवळजवळ सहा महिन्यानंतर अखेर एमएमआरडीएने याबाबत नागरिकांचा सल्ला मागितला आहे. रविवारी एमएमआरडीएने पब्लिक नोटीस प्रसारित करून मेट्रो- ६ कॉरीडॉर, पर्यावरण आणि समाजावरील बांधकामांच्या प्रभावाबाबत […]
तुम्ही या लोकशाहीचे बादशहा आहात; माहिती अधिकार कायद्याचे ज्ञान आवश्यक
माहिती अधिकार अधिनियम कायदा हा सर्व सामान्य जनतेसाठी महत्वाचा नागरिकाभिमुख कायदा आहे. तुम्ही या लोकशाहीचे बादशहा आहात. पारदर्शकता, उत्तरदायित्व यासाठी या कायद्याच्या संकल्पना व कार्यपद्धतीबाबत कायद्याचे ज्ञान असणे अत्यंत आवशक आहे. माहिती अधिकार अधिनियम कायदा हा सर्व सामान्य जनतेसाठी महत्वाचा नागरिकाभिमुख कायदा आहे. पारदर्शकता, उत्तरदायित्व यासाठी या कायद्याच्या संकल्पना व कार्यपद्धतीबाबत कायद्याचे ज्ञान असणे अत्यंत […]
मेट्रो – ६ प्रकल्पामुळे पवई तलावाचे ‘मगर उद्यान’ गुंडाळले
मुंबईतील पहिलेवहिले मगर उद्यान पवई तलावात बनवण्याचे महापालिकेचे स्वप्न जवळपास भंगल्यात जमा आहे. मेट्रो सहा प्रकल्पा अंतर्गत लोखंडवाला-जोगेश्वरी-पवई-विक्रोळी-कांजुरमार्ग असा मेट्रो सहाचा कॉरीडोर निश्चित केला आहे. या मेट्रो-सहा प्रकल्पाच्या कामात पवईमधील पवई तलाव परिसरातील काही भाग बाधित होणार असल्याकारणाने प्रस्तावित मगर उद्यानाचा विचार मेट्रो पूर्ण झाल्यानंतर केला जाणार आहे. २०० हेक्टर जागेत निसर्गरम्य परिसरात असणाऱ्या या […]
पवई तलावाची स्वच्छता जागतिकस्तरावर; भारतातील पहिलाच प्रयोग
परदेशातील नद्या, तलावे इतके स्वच्छ असतात की त्यांच्या सौंदर्याची कुणालाही भुरळ पडते. भारतातील नद्या आणि तलाव गटारगंगा झाल्या आहेत. जे पाहता मुंबई महानगर पालिकेने प्रदूषित मिठी नदी आणि पवई तलावाच्या स्वच्छतेसाठी जागतिक स्तरावरील तंत्रज्ञान वापरण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी लवकरच दासून इंटरनॅशनल या कॅनेडियन कंपनीसोबत एक करार करण्यात येणार आहे. पवई तलावाच्या स्वच्छतेसाठी महापालिका कॅनडातील […]
वैद्यकीय अभ्यासक्रमात नेत्रदीपक यश संपादन करणाऱ्या विद्यार्थिनींचा सन्मान
मुंबईतील किंग एडवर्ड मेमोरियल हॉस्पिटल (के ई एम रुग्णालय) व सेठ गोर्धनदास सुंदरदास मेडिकल कॉलेजमध्ये न्यूरोसर्जन आणि ऑपरेशन आणि एनेस्थेसिया (पॅरामेडीकल टेक्नोलॉजी) अभ्यासक्रमात नेत्रदीपक यश संपादन करणाऱ्या कुमारी नितल नितीन भावसार, कुमारी काजल गौडा आणि कुमारी रूणीका राजू गाडे या तीन पवईकर कन्यांचा येथील नागरिक आणि संस्थांच्यावतीने सन्मान करण्यात आला. कुमारी नितल नितीन भावसार हिने […]
पवईकरांच्या तोंडचे पाणी पळवणाऱ्या कंत्राटदाराला पालिकेचे अभय?
पाणीटंचाईने त्रस्त झालेल्या पवईकरांच्या हिस्स्याचे पाणी आपल्या रस्तेबांधणीच्या कामात खाजगी कंत्राटदार वापरत असल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. सामाजिक कार्यकर्ते मुक्ताराम कांबळे यांनी या चोरीचा व्हिडीओ सोशल माध्यमातून प्रसारित करत याचा भांडाफोड केला. हा प्रकार उघडकीस येताच पवईकरांच्या तोंडचे पाणी पळवले जात असल्याने रहिवाशी संताप व्यक्त करत आहेत. या कंत्राटदाराला पालिकेने अभय दिले असून, […]
आज पवईत रंगणार आंबेडकरी कवी संमेलन
आज (५ मे २०१९) पवईत प्रथमच आंबेडकरी कवी संमेलन रंगणार आहे. भिमसेना पवई प्रतिष्ठाण आयोजित डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२८ व्या जंयती निमित्त आयआयटी मार्केट परिसरात सायंकाळी ५ ते ७ या वेळेत हे आंबेडकरी कवी संमेलन होत आहे. वर्षा भिसे, रेशमा राणे, विलास बसवंत, प्रज्ञा रोकडे, भट्टू जगदेव, संगम पाईपलाईनवाला, वीणा भालेराव, विजय ढोकळे, साहेबराव […]
वाहतूक कोंडी, अतिक्रमण विरोधात चांदिवलीकर रस्त्यावर
चांदीवली परिसरात वाढत्या वाहतूक कोंडी आणि अतिक्रमण विरोधात एकत्रित येत चांदिवलीकरांनी रविवारी, २१ एप्रिलला रस्त्यावर उतरून शांतता मोर्चा काढत आपला राग व्यक्त केला. चांदिवली रहिवाशी संघटनेतर्फे (चांदिवली सिटीझन्स वेल्फेअर असोसिशन) काढलेल्या या मोर्चात मोठ्या संख्येने चांदिवलीकर सहभागी झाले होते. आमच्या या समस्यांचे लवकरात लवकर निवारण नाही झाले तर २९ एप्रिल रोजी लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात […]
हिरानंदानीत मोटारसायकल चालकांचा ‘वन वे’ ‘नो एन्ट्री’त धुमाकूळ; एकाला उडवले
हिरानंदानी येथे सेन्ट्रल एव्हेन्यूवर पायी चालणाऱ्या मुलाला भरधाव धावणाऱ्या एका मोटारसायकल चालकाने ‘वन वे’मध्ये घुसत उडवल्याची घटना शुक्रवारी घडली. अपघातानंतर मोटारसायकल चालकाने तेथून पलायन केले असून, अपघातानंतर बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या मुलाला प्रत्यक्षदर्शिने त्वरित रुग्णालयात दाखल केल्याने मोठा धोका टळला. याबाबत पवई पोलिस “हिट अंड रन”चा गुन्हा दाखल करून सीसीटीव्हीच्या आधारे तपास करत आहेत. हिरानंदानीच्या रस्त्यांवर […]
सोशल मिडीयावर भेटलेल्या मैत्रिणीने सव्वा लाख उकळले
पूर्वी शाळा, कॉलेज आणि खेळाच्या मैदानावर मित्र भेटण्याची जागा आता सोशल माध्यमांनी घेतली आहे. समोर असणाऱ्या व्यक्तीपेक्षा दूरवर कुठेतरी बसलेल्या अनोळख्या व्यक्तीशी मैत्री करणे लोक जास्त पसंत करू लागलेत. याचाच फायदा घेत पाठीमागील काही वर्षात ऑनलाईन फसवणुकीच्या गुन्ह्यात वाढ झाली आहे. मैत्री जुळवणाऱ्या सोशल माध्यमात अनोळखी तरुणीशी मैत्री करणे साकीनाका येथील तरुणाला चांगलेच महागात पडले […]
केटामाईन तस्करी प्रकरण: ७ आरोपी दोषी, पवईतील दोन आरोपींचा समावेश
केटामाईनच्या तस्करी प्रकरणी जळगाव जिल्हा तसेच सत्र न्यायालयात चालू असलेल्या खटल्यात न्यायालयाने १२ पैकी ७ आरोपींना दोषी ठरविले आहे. दोषी ठरवण्यात आलेल्या आरोपींमध्ये २ पवईतील आहेत तर १ विक्रोळी भागातील. ५ जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. पाठीमागील ५ वर्षांपासून जळगाव न्यायालयात हा खटला सुरू होता. दोषी आरोपींना २२ एप्रिल रोजी शिक्षा सुनावली जाणार आहे. […]
नशेखोराने अपहरण केलेल्या मुलाची सुखरूप सुटका; पवई पोलिसांची कारवाई
साकीनाका पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दोन दिवसापूर्वी अपहरण झालेल्या आठ वर्षीय मुलाचा शोध घेवून अपहरण करणाऱ्या नशेखोर तरुणाला पवई पोलिसांनी बेड्या ठोकून साकीनाका पोलिसांच्या ताब्यात दिले. साकीनाका येथून अपहरण झालेल्या एका आठ वर्षाच्या मुलाची वीस वर्षीय नशेखोराच्या तावडीतून पवई पोलिसांनी सोमवारी सुखरूप सुटका केली. रात्री गस्तीवर असणाऱ्या पवई पोलिसांच्या बीट मार्शलची नजर एका नशेखोराजवळ असणाऱ्या लहान […]
एटीएम कार्ड क्लोनिंगद्वारे १६ पवईकरांचे लाखो रुपये उडवले
एकाचवेळी १६ जणांच्या बँक खात्यातून पैसे गायब. पाच जणांची पोलिस ठाण्यात तक्रार. वेगवेगळ्या ठिकाणच्या एटीएम सेंटरमधून ३.२० लाख रुपये काढले. एकाच वेळी १६ पवईकरांच्या बँक खात्यांना भेदून लाखो रुपये सायबर गुन्हेगारी टोळीने गायब केल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. या संदर्भात ५ लोकांनी पवई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पाचही जणांच्या खात्यामधून वेगवेगळ्या […]

