ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्यावरील भ्याड हल्ल्याचा मुंबईसह महाराष्ट्रभरात ठिकठिकाणी जाहीर निषेध करण्यात येत आहेत. पवई येथे देखील ‘ईशान्य मुंबई पत्रकार असोसिएशन’ पुरस्कृत पवई दैनिक पत्रकार संघाच्यावतीने निषेध व्यक्त करत पवई पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांकडे निवेदन सादर करण्यात आले. हल्लेखोरांवर कठोरात कठोर शासन व्हावे यासाठी निवेदनातून वरिष्ठ पोलिसांमार्फत मुख्यमंत्रांकडे मागणी करण्यात आली आहे.
पुणे येथे एका कार्यक्रमासाठी जात असताना ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्या गाडीवर काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी हल्ला करत त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. त्यातून ते थोडक्यात बचावले असून, अशा प्रकारे एका ज्येष्ठ पत्रकारावर हल्ला होणं ही बाब निकोप लोकशाहीचा गळा घोटणारी आहे. पत्रकारांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणारी ठरत आहे.
लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर जर हल्ले होत असतील तर ही लोकशाहीची क्रुर विटंबना आहे. असे हल्ले रोखण्यासाठी आरोपींवर कठोरात कठोर शासन होणे गरजेचे आहे, असे ईशान्य मुंबई पत्रकार असोसिएशनने पोलिसांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
यावेळी ईशान्य मुंबई पत्रकार असोसिएशनचे रामकृष्ण खंदारे, मुकेश त्रिवेदी, प्रमोद चव्हाण, प्रशांत वायदंडे, अविनाश हजारे, रविराज शिंदे, रमेश कांबळे, तुषार विरकर, आनंद इंगळे, गौरव शर्मा आणि आकाश पगारे आदी. उपस्थित होते.
ज्येष्ठ पत्रकार, लेखक पद्मश्री मुझफ्फर हुसेन यांचे मंगळवारी सायंकाळी ७.३० वाजता पवई येथील हिरानंदानी हॉस्पिटलमध्ये दीर्घ आजाराने निधन झाले. ते ७८ वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्यावर आज (बुधवारी) सकाळी १०.३० वाजता विक्रोळी स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात येतील. पद्मश्री मुझफ्फर हुसेन प्रख्यात लेखक,…
रानंदानीतील डी-मार्ट जवळील चौकाला निर्भीड पत्रकार जेडे यांचे नाव देण्यात आले आहे. बुधवारी १३ जूनला महापौर स्नेहल आंबेकर यांच्या हस्ते नामफलकाचे उदघाटन करण्यात आले. यावेळी जेडे यांच्या पत्नी शोभा डे, हिरानंदानी समूहाचे व्यवस्थापकीय संचालक निरंजन हिरानंदानी, आमदार नसीम खान, नगरसेवक चंदन शर्मा, प्रेस क्लबचे अध्यक्ष गुरबीर सिंग व मोठ्या प्रमाणात…
पुलवामा येथे केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) जवानांवर भ्याड दहशतवादी हल्ल्यात ४४ जवान शहीद झाले. या घटनेमुळे देशभर संताप व्यक्त होत असून, विविध राजकीय पक्ष व सामाजिक संस्था, संघटना, शाळा महाविद्यालयातर्फे शहिदांना श्रद्धांजली अर्पण करीत दहशतवादी कृत्याचा निषेध करत आहेत. पवईमध्ये सुद्धा पवईकरांनी रस्त्यावर येत एकजुटीने कॅण्डल मार्च काढून, शोकसभा,…
No comments yet.