चांदिवली येथील लेकहोम कॉम्प्लेक्समधील लेक फ्लोरेन्स इमारतीच्या ‘बी’ विंगमधील १३व्या मजल्यावरील एका फ्लॅटमध्ये आग लागल्याची घटना आज (मंगळवार) संध्याकाळी ३.४५ वाजण्याच्या सुमारास घडली. अग्निशमन दलाच्या साहय्याने काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. मात्र आगीची माहिती मिळाल्यानंतर घाबरलेल्या नागरिकांमध्ये धावपळ सुरु झाल्याने घसरून पडून आणि धूर शरीरात गेल्याने श्वसनाचा त्रास जाणवू लागल्याने ११ जणांना हिरानंदानी रुग्णालयात […]
पवई तलावाला हळूहळू नष्ट करणाऱ्या जलपर्णीना काढण्याबाबत विचारले असता पालिकेच्या अधिका्यांनी नुकतेच केले असल्याचे निर्दोषपणे सांगितले. एका अधिकाऱ्याने प्रतिनिधीना सांगितले की, आयआयटी बॉम्बेमध्ये झालेल्या एका कार्यक्रमानंतर काही वरिष्ठ अधिका-यांनी म्हटले “कोई हायसिंथ नजर ही नहीं आयी है.” त्याच्यावर प्रतिनिधींनी उत्तर दिले “अगर आप इस मामले में अपना हाथ गंदा करना चाहेंगे और गाड़ी से उतरेंगे […]
पवई तलावात इसमांना बेकायदेशीर मासेमारी करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका सुरक्षा रक्षकावर दोन इसमांनी हल्ला करून त्याला पवई तलावामध्ये ढकलून दिल्याची घटना घडली आहे. शेरबहादूर खान असे या सुरक्षा रक्षकाचे नाव आहे. सुरक्षा रक्षकाने यासंदर्भात पवई पोलिस ठाणे गाठत दोघांविरूद्ध तक्रार नोंद केली आहे. या प्रकरणाचा तपास करत असून, गुन्ह्यात पोलिसांनी अद्याप कोणालाही अटक केलेली […]
पवई येथे शनिवारी रात्री घडलेल्या हिट अँड रन अपघातात एका २५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. अपघातात मृत्युमुखी पडलेला तरुण हा होमगार्ड अधिकारी होता. शनिवारी रात्री कर्तव्यावरुन परतत असताना हा अपघात घडला. पवई पोलिसांनी याबाबत अज्ञात वाहनचालकाविरुध्द निष्काळजीपणे आणि हयगयीने वाहन चालवून मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल केला आहे. सचिन काशिनाथ धुमक यांना शनिवारी मरोळ […]
गणेशोत्सवाची सगळीकडे धूमधाम सुरु आहे. या उत्सवादरम्यान पर्यावरणाला हानी पोहचू नये म्हणून मिठी नदी आणि पवई लेकच्या मातीपासून शेकडो पर्यावरण प्रेमी तरुणांनी लोकांनी पर्यावरणपूरक गणेशाची निर्मिती केली. यंग एन्वायरमेंटलिस्ट्स प्रोग्राम ट्रस्टने यासाठी कार्यशाळेचे आयोजन केले होते. गणेशोत्सवात होणारी निसर्गाची हानी टाळण्यासाठी निसर्ग रक्षण आणि संवर्धनासाठी काम करणाऱ्या यंग इन्वायरमेंटच्यावतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही ‘इको फ्रेंडली’ गणेशाची कार्यशाळा […]
गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या ! अशा गर्जणेत, ढोल-ताशे आणि बॅंजोच्या निनादासह आबालवृद्धांच्या उत्स्फूर्त उत्साहात दिड दिवसाच्या अनेक घरगुती व सार्वजनिक गणपती बाप्पाचे मंगळवारी पुढच्या वर्षी लवकर येण्याचे निमंत्रण देवून भावपूर्ण आणि जड अंतकरणाने विसर्जन पवई तलावाच्या दोन्ही घाटांवर करण्यात आले. सोमवारी वाजत-गाजत, ढोल-ताशांच्या गजरात आगमन झालेल्या बाप्पांनी, दिड दिवस पाहूणचार घेतल्यानंतर मंगळवारी […]
पवई तलावाचे पर्यटन महत्व लक्षात घेऊन आमदार निधीतून नुकतेच “माय इंडिया” सेल्फी पॉईंटची निर्मिती येथे करण्यात आली आहे. स्थानिक आमदार मो. आरिफ (नसीम) खान यांच्या निधीतून याची निर्मिती करण्यात आली आहे. या सेल्फी पॉईंटचे रविवारी पवईतील शालेय विद्यार्थ्यांनी आपल्या लाडक्या आमदारासोबत सेल्फी घेत उद्घाटन केले. यावेळी सुट्टीचा दिवस असतानाही आणि भर पावसात मोठ्या प्रमाणात पवईतील […]
कंत्राटदाराची नेमणूक करणे बाकी असल्यामुळे मुंबईतील लोकप्रिय पर्यटन स्थळ असणाऱ्या पवई तलावाला सहा महिन्यांपासून साफ केले गेले नाही. जर लवकरात लवकर जलपर्णीना काढून टाकले नाही तर लवकरच तलावाचा संपूर्ण पृष्ठभाग व्यापला जाईल अशी चिंता पर्यावरण प्रेमी व्यक्त करत आहेत. मुंबईचे वैभव असणारा पवई तलाव दिवसेंदिवस नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. याची पाणी साठवण्याची क्षमता हळू हळू […]
पवई तलावात आपल्या मित्रांसोबत पोहायला आलेल्या १६ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना काल (सोमवारी) संध्याकाळी ६.२० वाजता पवई तलाव भागात घडली. सत्यम गुप्ता असे या मुलाचे नाव असून, तो विक्रोळी टागोरनगर येथील रहिवाशी होता. याबाबत पवई पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे. विक्रोळी येथील टागोरनगर भागात राहणारे काही तरुण काल संध्याकाळी पवई […]
पवई परिसरात मोठ्या ग्राहकांना आणि व्यापाऱ्यांना विकण्यासाठी आणलेल्या ५.५ लाखाच्या गांजासह पवई पोलिसांनी दोन तरुणांना अटक केली आहे. अनिकेत अमर पवार (२४), सुरेश झोकु गुप्ता (३८) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. कलम ८ (क) सह २० एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा नोंद करून, त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. पवई पोलिसांनी […]
या तलावात निर्माण झालेल्या प्रदूषणापासून तलावाला वाचवण्यासाठी, पुनर्विकास करण्यासाठी आणि त्यास संरक्षित करण्यासाठी अनेक योजनांवर काम केले जात आहे. तलावात समृद्ध जैव विविधता आणि मगरीच्या दुर्मिळ प्रजाती आहेत. पवई तलाव भागाचे सुशोभिकरण केल्यामुळे पर्यटकांची संख्या वाढली आहे. पवई तलावात स्कुबा डायव्हिंग, वॉटर पोलो, बोट रेसिंग सारख्या जलक्रीडा सुरु करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. तसा ठरावही […]
पवई तलाव भागात तरुणीला छेडछाड करणाऱ्या तरुणांना रोखणाऱ्या एका तरुणावर प्राणघातक हल्ला करून त्याला गंभीर जखमी केल्याची घटना काल रात्री ७.३० वाजता पवई परिसरात घडली आहे. रोहित बावधाने असे जखमी तरुणाचे नाव असून, त्याच्यावर घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पवई पोलिसांनी भादवि कलम ३२६ नुसार गुन्हा नोंद करून, हल्ला करणाऱ्या एका तरुणाला ताब्यात […]
आवर्तन पवई आणि पवईकरांच्या परिश्रमाला यश मिळाले असून, पवई तलाव भागात टाकला जाणारी डेब्रिज उचलण्यास सुरुवात झाली आहे. आवर्तन पवई सह पवईकर मुक्ताराम कांबळे, डीपीके उदास यांनी पालिकेला लेखी तक्रार करत याकडे लक्ष वेधले होते. अनेक पवईकरांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून मुद्दा लावून धरला होता. या सर्व प्रयत्नांना यश आले असून, फुटपाथ आणि चालण्यासाठी असणाऱ्या मार्गावरील […]
आपल्या निसर्ग सौंदर्यामुळे मुंबईच्या मुख्य पर्यटनस्थळांपैकी एक मानाचे स्थान मिळवलेल्या पवई तलाव भागाचा पाठीमागील काही वर्षात उकिरडा आणि नाला झाला आहे. पवई परिसरातील मैल, कचरा, घाणपाणी पवई तलावात सोडले जात असल्यामुळे त्याचा श्वास गुदमरून तो नष्ट होण्याच्या मार्गाने वाटचाल करत आहे. त्यात भर म्हणूनच की काय आता या भागात खोदकाम आणि बांधकामानंतर निघणारा मलबा आणून […]
पाठीमागील काही दिवसांपासून पवई तलाव भागात अज्ञान व्यक्तींकडून बांधकाम आणि खोदकामाची डेब्रिज (मलबा) टाकला जात असून, यामुळे पवई तलावाचे भवितव्य धोक्यात येत आहे. या परिस्थितीला घेवून “आवर्तन पवई”ने ३० मे रोजी पवई तलाव भागाचा झाला “उकिरडा”, परिसरात टाकला जातोय मलबा या मथळ्याखाली बातमी करत पाठपुरावा करून पालिका अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले होते. याची दखल घेत पालिकेने […]
ग्रामीण भागात घरातून निघणारा कचरा, घाण, जनावरांच्या गोठ्यातून निघणारे मैल–मुत्र टाकण्यासाठी परिसरात मोकळ्या जागेत भलामोठ्या रुंदीचा खड्डा मारून त्यात ते टाकले जाते. ज्यास ग्रामीण भाषेत “उकीरंडा” असा शब्द वापरला जातो. पवईतील पवई तलाव भागाची सुद्धा पाठीमागील काही वर्षात अशीच अवस्था झाली आहे. परिसरातील मैल, कचरा, घाणपाणी सध्या तलावात सोडले जात असून, त्याचा श्वास गुदमरू लागला […]
मुंबईतील पहिलेवहिले मगर उद्यान पवई तलावात बनवण्याचे महापालिकेचे स्वप्न जवळपास भंगल्यात जमा आहे. मेट्रो सहा प्रकल्पा अंतर्गत लोखंडवाला-जोगेश्वरी-पवई-विक्रोळी-कांजुरमार्ग असा मेट्रो सहाचा कॉरीडोर निश्चित केला आहे. या मेट्रो-सहा प्रकल्पाच्या कामात पवईमधील पवई तलाव परिसरातील काही भाग बाधित होणार असल्याकारणाने प्रस्तावित मगर उद्यानाचा विचार मेट्रो पूर्ण झाल्यानंतर केला जाणार आहे. २०० हेक्टर जागेत निसर्गरम्य परिसरात असणाऱ्या या […]
परदेशातील नद्या, तलावे इतके स्वच्छ असतात की त्यांच्या सौंदर्याची कुणालाही भुरळ पडते. भारतातील नद्या आणि तलाव गटारगंगा झाल्या आहेत. जे पाहता मुंबई महानगर पालिकेने प्रदूषित मिठी नदी आणि पवई तलावाच्या स्वच्छतेसाठी जागतिक स्तरावरील तंत्रज्ञान वापरण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी लवकरच दासून इंटरनॅशनल या कॅनेडियन कंपनीसोबत एक करार करण्यात येणार आहे. पवई तलावाच्या स्वच्छतेसाठी महापालिका कॅनडातील […]
