आमचे फेसबुक पेज लाईक करण्यासाठी इथे क्लीक करा
आमचे फेसबुक पेज लाईक करण्यासाठी इथे क्लीक करा
विसर्जन काळात जीवरक्षक म्हणून काम करणाऱ्या महेशच्या मृत्यूस सुरक्षाव्यवस्था आणि विसर्जन व्यवस्था जबाबदार आहे, त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी घेऊन मंगळवारी रात्री पवईतील नागरिकांनी पवई प्लाझा ते गणेशनगर गणेश विसर्जन घाट असा मूक कॅंडल मार्च काढला. बुधवारी प्रतिनिधींनी पवई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची भेट घेऊन आपली मागणी ठेवली. रविवारी गणेश विसर्जनासाठी तलावात गेलेल्या महेश […]
पवई तलावात विसर्जनासाठी गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याच्या घटनेने संपूर्ण पवईवर शोककळा पसरलेली असतानाच, गणेश विसर्जनाचे काम पाहणाऱ्या ‘पवई नागरिक सेवा संस्था’ या समाजसेवी संस्थेने महेश यास पोहता येत नसल्याने विसर्जनाच्या कामास मनाई केली होती असा दावा केला आहे. या घटनेने सुरक्षा व्यवस्थेचा मोठा प्रश्न गणेश विसर्जनाच्या कामकाजावर उपस्थित झाला असून, याची नक्की जबाबदारी कोणाची? […]
गणेश विसर्जनासाठी तलावात गेलेल्या तरुणाचा पवई तलावात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना काल (रविवारी) पवईत घडली. महेश गौड (२४) असे या तरुणाचे नाव असून, तो स्वतः लाइफ गार्ड म्हणून विसर्जन काळात काम पाहतो. रविवारी सात दिवसाच्या घरगुती आणि सार्वजनिक गणेशांचे विसर्जन पवई तलावाच्या दोन्ही घाटांवर सुरु होते. अशाच एका सार्वजनिक गणेश मंडळाचा गणपती रात्री ११.५० […]
ढोल – ताशांच्या गजरात व गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या… अर्धा लाडू फुटला गणपती बाप्पा उठला…. या जयघोषात मंगळवारी दिड-दिवसाच्या गणरायाला पवई तलावाच्या दोन्ही घाटांवर गणेश भक्तांनी विसर्जन करून निरोप दिला. मुंबईमध्ये गणपती बसवणार्यांमध्ये दिड दिवसाच्या गणपतींचे प्रमाण अधिक असते. यंदाही अनेकांनी नवसपूर्ती व परंपरा पाळत गणरायाची चतुर्थीला प्रतिष्ठापणा केली आहे. मंगळवारी पवई, […]
पर्यावरण सचिव व पालिका अतिरिक्त आयुक्तांना नदी संवर्धन संचालनालयाने दिला आदेश पवई तलावाच्या प्रदूषणाची केंद्रिय पर्यावरण मंत्रालयाने गंभीर दखल घेत, राष्ट्रीय नदी संवर्धन संचालनालयाने याबाबतचा अहवाल मागवला आहे. राज्य पर्यावरण खात्याचे सचिव व मुंबई महानगरपालिका अतिरिक्त आयुक्तांना पवई तलावात किती प्रदूषण झाले आहे? त्यावर काय कारवाई करण्यात आली? याचा सविस्तर अहवाल तात्काळ सादर करण्याचे आदेश […]
@सिद्धार्थ शिरसट पवई तलावात मासेमारीस निर्बंध आहेत. तलावातील मगरी बाहेर आल्याच्या घटनासुद्धा घडलेल्या आहेत. जे पाहता तलावात मगरी आहेत, मगरींपासून सावधान, पाण्यात उतरू नका असे फलक पालिका आणि वन विभागातर्फे लावण्यात आलेले आहेत. मात्र, नियम धाब्यावर बसवत पवई तलावात सर्रासपणे मासेमारी केली जाते आहे. याकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने, येथे जर एखादा अपघात घडला तर […]
पवई तलावात असणाऱ्या मगरी आतापर्यंत केवळ तलावात असणाऱ्या टेकड्यांवरच आढळून येत, मात्र सोमवारी यातील एक मगरीने तलावातून बाहेर निघत, लोकांना चालण्यासाठी बनवलेल्या पदपथावर अक्षरशः ‘ट्रॅक वॉक’ करून परत तलावात परतली. पवई तलावातील त्यांची बसण्याची ठिकाणे उध्वस्त झाल्याने मगरी आता बाहेर निघू लागल्याचे प्राणीमित्र आणि पर्यावरणवादी संस्थांचे म्हणणे आहे. सोमवारी संध्याकाळी पवई तलाव भागात फिरत असणाऱ्या […]
गेल्या आठवडाभर पडलेल्या पावसामुळे पवई तलाव भरला असून, मुंबईकरांचे आकर्षण असणारे पवई तलाव धरण ओसंडून वाहू लागले आहे. लोकांच्या सुरक्षेसाठी तलाव भागात बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शनिवारी सकाळपासूनच या भागात मुंबईकरांनी गर्दी केली होती. आठवडाभर मुंबईला पावसाने झोडपले आहे. तलाव क्षेत्रात मुबलक पाऊस पडल्याने पाण्याच्या पातळीत लक्षणीय वाढ होत, शुक्रवारी संध्याकाळ पासून पवई तलाव तुडुंब […]
पवई तलावात सोडण्यात येणाऱ्या सांडपाण्यामुळे पवई तलाव प्रदूषित झाला असून, मगर दर्शन घडणाऱ्या मुंबईतील एकमेव पवई तलावातील मगरींचे अस्तित्वही धोक्यात आले आहे. तलावातील वाढत्या प्रदूषणामुळे तलावात असणाऱ्या मगरींचा आधिवास संपुष्टात येत असल्याबाबत प्राणीमित्र आणि पर्यावरणवादी संस्थांनी तक्रारी दिल्या आहेत. मात्र, या मगरींचे संवर्धन करण्यास व पालकत्व घेण्यास महापालिका आणि ठाणे वन विभाग एकमेकांकडे बोटे दाखवत […]
नैसर्गिक संपत्ती असणाऱ्या पवई तलावात गेले अनेक महिने दुषित, घाण, गटाराचे पाणी सोडून प्रदूषण केले जात आहे. पवई तलावाची गेल्या काही वर्षात झालेली दुर्दशा विचारात घेता, पवई तलाव वाचवण्यासाठी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. या याचिकेच्या सुनावणी दरम्यान उच्च न्यायालयाने म्हाडा व मुंबई महानगरपालिकेने तलावाला वाचवण्यासाठी काय पावले उचलली आहेत? अशी विचारणा केली […]
पवई तलावाला गेल्या अनेक दिवसापासून गटाराचे सांडपाणी सोडून प्रदूषित केले जात आहे. यासंदर्भात स्थानिक जनता आणि पर्यावरणवादी संस्थेने पालिकेला तक्रारी दिल्या आहेत. मात्र हे सर्व पालिकेच्या संगनमताने होत असल्याने, पालिका अधिकारी संस्थेच्या प्रतिनिधिंना भेट देण्यास टाळाटाळ करत आहेत व बेजबाबदार वक्तव्य व उडवाउडवीची उत्तरे देवून पळवाटा शोधत असल्याचा आरोप स्थानिकांकडून होत आहे. या प्रकरणात निष्काळजीपणा […]
जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत मानवी साखळीतून केली जनजागृती रविराज शिंदे ‘भ्रष्टाचाराचा बोलबाला, पवई तलावाचा नाला केला’ ‘दुर्लक्ष कोणाचे? लोकप्रतिनिधींचे, पालिका प्रशासनाचे’ या घोषणांनी रविवारच्या सकाळी पवई तलाव परिसर निनादला. पवई तलावात पावसाचे पाणी सोडण्यासाठी करण्यात आलेल्या सुविधांमधून येथील वसाहतीतील सांडपाणी सोडले जात आहे. तलावाची होणारी दुर्दशा रोखण्यासाठी व नैसर्गिक अस्तित्व राखण्यासाठी ‘युथ पॉवर’ संघटनेने […]
साकिनाका परिसरातून सहा वर्षांच्या मुलाचे अपहरण करण्यात आले होते. याचा तपास करणाऱ्या साकीनाका पोलिसांनी अथक प्रयत्न करत अवघ्या तीन तासांमध्ये त्याला शोधून काढत आईवडिलांच्या ताब्यात दिले. या गुन्ह्याच्या उकलीमुळे केवळ अपहरणाच्या गुन्ह्याचाच उलघडा झाला नसून, त्याच्या वडिलांच्या विवाहबाह्य संबंधाचे पितळ सुद्धा उघडे पडले आहे. साकिनाका येथील हॉलिडे इन हॉटेल जवळ असणाऱ्या सत्यानगर पाईप लाईन जवळील […]
रविराज शिंदे उन्हामुळे शरिराची काहिली होत असतानाचा आयआयटी भागात बसथांब्यांवर लोकांना सावलीसाठी छत नसल्याने, प्रवाश्यांना कडक उन्हाच्या झळा सोसत उभे रहावे लागत आहे. वर्षानुवर्ष सोसत असणाऱ्या पवईकरांच्या या समस्येला वाचा फोडण्यासाठी, येथील युथपॉवरच्यावतीने प्रवाश्यांना छत्री वाटून अनोखा निषेध नोंदवत या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधणारा चिमटा काढला आहे. जोगेश्वरी विक्रोळी लिंकरोड निर्मिती दरम्यान या रस्त्यावर ठिकठिकाणी […]
अविनाश हजारे पवई तलावाचे होणारे गटार रोखण्यासाठी आवर्तन पवई, पॉज मुंबई आणि पवईकर यांनी हाती घेतलेल्या पवई तलाव मोहिमेला उदंड प्रतिसाद मिळत आहे. याचाच एक भाग म्हणून मंगळवारी खासदार किरीट सोमय्या यांनी तलावाला भेट देत त्याची पाहणी करून झालेल्या दुरावस्थेसाठी पालिका अधिकाऱ्यांना फैलावर घेत त्वरित समस्या सोडवण्याचे आदेश दिले आहेत. मुंबईच्या सौंदर्यात भर टाकणाऱ्या पवई […]
पवई तलावात सोडले जाणाऱ्या दुषित, घाण पाण्यामुळे तलाव प्रदूषित होत आहे. जे पाहता प्लॅंट एंड एनिमल वेल्फेअर सोसायटी (पॉज) मुंबईने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री (वन आणि पर्यावरण) प्रकाश जावडेकर यांना पत्राद्वारे पवई तलावाला ‘मगर पार्क’ घोषित करण्याची मागणी केली आहे. सोबतच तलाव भागात परवाना आणि विनापरवाना दोन्ही प्रकारे चालणारी मच्छिमारी रोखण्याची मागणी सुद्धा […]
करोडो रुपये खर्च करून सौंदर्यीकरण करण्यात आलेल्या पवई तलावातील पाण्यात आसपासच्या परिसरातून गटाराचे पाणी सोडण्यात येत आहे, त्यामुळे तलावातील पाणी दुषित होत असून, तलावात घाणीचे साम्राज्य पसरून तलावाचे रूपांतर हळूहळू गटारात होत आहे. संपूर्ण पवई तलावाच्या परिसरातून जाताना लोकांना येथून येणाऱ्या दुर्गंधीमुळे नाकावर रूमाल ठेवून प्रवास करावा लागत आहे. मुंबईकर राजेश पिल्लाई यांनी फोन आणि […]
बसमधून प्रवास करताना अठरा वर्षीय कॉलेज विद्यार्थिनीशी अश्लील चाळे करणाऱ्या एका विकृताला त्या रणरागिनीने चांगलाच इंगा दाखवला आहे. सहप्रवाशांची साथ मिळत नसतानाही तिने धाडस करून त्याला धरून पवई पोलिसांच्या स्वाधीन केले. याबाबत पोलिसांनी आरोपी अशोक नलवे (४३) यास भादवी कलम ३५४ अन्वये गुन्हा नोंद करत अटक केली आहे. गोरेगाव येथील एका नामांकित कंपनीत प्रशिक्षण घेत […]
पवई तलावात मासेमारीसाठी जाणाऱ्या लोकांवर होणारे मगरीचे हल्ले वाढलेले आहेत. जे पाहता तिरंदाज व्हिलेज आणि स्थानिक परिसरातील लोक पोलीस आणि पालिका प्रशासन यांना सुरक्षा कुंपणाची मागणी करणारे पत्र देणार आहेत. पवई तलावातील ठराविक भागात सुरक्षा कुंपण टाकून स्थानिक मच्छीमारांसाठी ती जागा मासे पकडण्यासाठी सुरक्षित करावी अशी मागणी या पत्राद्वारे करण्यात येणार आहे. स्थानिक नगरसेवक आणि […]
