आयआयटी कॅम्पसमधून वायर चोरी करणाऱ्या टोळीसह भंगारवाल्याला अटक
आयआयटी पवई कॅम्पस भागातील सुरक्षा व्यवस्थेला भेदत, येथील तांब्याच्या वायर चोरी करणाऱ्या टोळीच्या तीन लोकांना पवई पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने शुक्रवारी उशिरा अटक केली आहे. या गुन्ह्यातील सगळा चोरीचा माल खरेदी करणाऱ्या भंगारवाल्याला सुद्धा पवई पोलिसांनी अटक करत संपूर्ण चोरीचा माल हस्तगत केला आहे. राहूल नारायण तायडे (२६), संतोष बाबासाहेब गोरे (२६), विनोद राजाराम गुलगे […]
पवईत नामांकीत हॉटेलमधून चालणार्या सेक्स रॅकेटचा भांडाफोड, ३ पिडीत महिलांची सुटका
सोशल मीडियामध्ये वेश्याव्यवसायाची जाहिरात करून हायप्रोफाईल सेक्स रॅकेट चालवले जात होते. एका नामांकीत हॉटेलमधील कॅशियरसोबत हातमिळवणी करून सोशल मिडिया, वेबसाईट जाहिरातींच्या माध्यमातून पवईत चालणार्या हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा गुन्हे शाखा कक्ष सातने पर्दाफाश केला आहे. रविवारी हॉटेल रिलॅक्स इन रेसीडेन्सी हॉटेलमध्ये छापा मारत, संबंधित सेक्स रॅकेटमधील पीडित ३ महिलांची सुटका करण्यात आली आहे. यामध्ये हॉटेलच्या कॅशिअरला […]
स्पॉटेड: अभिषेक बच्चन, अनुराग बासू यांच्या आगामी चित्रपटाचे चांदिवली येथे शूटिंग करताना
अनुराग बासू यांच्या दिग्दर्शनाचे, ज्याचे शीर्षक अजून नक्की करण्यात आलेले नाही, याच्या शुटींग दरम्यान आवर्तन पवईने अभिनेता अभिषेक बच्चन याला आपल्या कॅमेऱ्यात कैद केले. अनुराग बासू यांच्या मल्टीस्टारर चित्रपटाचे शुटींग सध्या विविध ठिकाणी सुरु आहे. याच सिनेमाच्या एका भागाच्या शुटींगसाठी बुधवारी “जुनिअर बि” चांदिवली स्टुडीओमध्ये आला होता. अनुराग बासू यांच्या २००७ च्या लाइफ इन ए… […]
मेट्रो ६ आणि मेट्रो ४ प्रकल्पामुळे उद्भवणाऱ्या समस्यांसाठी लोकसंवादचे आयोजन
मुंबईची जीवनवाहिनी असणाऱ्या मुंबई लोकलवर वाढता दबाव आणि मुंबईला नवीन पर्यायी वाहतूक व्यवस्था असावी म्हणून मुंबई मेट्रोचे जाळे मुंबईसह आसपासच्या परिसरात पसरवले जात आहे. हे जाळे पसरवत असताना मेट्रोच्या कामामुळे अनेक ठिकाणी अडचणी निर्माण होत आहेत. मुंबई मेट्रो प्रकल्प ४ आणि ६ यांच्या निर्मितीवेळी नागरिकांना नेमक्या कोणत्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यावर काय उपाय […]
वृक्षाबंधन: विद्यार्थ्यांनी झाडांना राख्या बांधून दिला पर्यावरण रक्षणाचा संदेश
विद्यार्थ्यांनी प्राचीन वृक्षांना म्हणजेच मातृवृक्षांना राख्या बांधून वृक्ष आमचे भाऊ असून, ते दिर्घायुषी व्हावे व प्रदूषणाच्या दैत्यापासून आमचे रक्षण करावे अशी प्रार्थना केली. भारतीय संस्कृतीत महत्वाचा मानला जात असलेला राखी पोर्णिमेचा सण देशभरात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. या दिवशी बहिणी प्रेमाचे प्रतिक म्हणुन भावांना राख्या बांधतात आणि त्यांच्या प्रिय भावास दीर्घायुष्य लाभावे यासाठी प्रार्थना […]
सहाय्यक पोलिस आयुक्त मिलिंद खेतले यांना राष्ट्रपती पोलिस पदक जाहीर
विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपतींचे पोलीस पदक, तिसऱ्यांदा राष्ट्रपती पुरस्कार महाराष्ट्रातील ४१ वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना आज (बुधवार) स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती पुरस्कार जाहीर झाले आहेत. यामध्ये साकीनाका विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त (एसीपी) मिलिंद खेतले यांचा सुद्धा समावेश आहे. विशेष सेवेसाठी यावर्षीचे राष्ट्रपती पोलीस पदक त्यांना जाहीर करण्यात आले आहे. पोलिस दलात केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल राष्ट्रपती पुरस्कार दिला […]
दुचाकी चोरून त्याचे सुट्टे भाग विकणाऱ्या टोळीला अटक
पवई परिसरातील एक महागडी दुचाकी चोरी केल्याची आरोपींची कबुली मुंबई आणि नवी मुंबईच्या विविध भागातून महागड्या मोटारसायकल चोरी करून त्या सुट्ट्या भागात विकणाऱ्या टोळीच्या ४ सदस्यांना गुन्हे शाखा ७ कक्षाने बेड्या ठोकल्या आहेत. कय्यूम ईद्रिस खान (४३) सोहेब राजू खान (२०), मुदसीर फैज़ल खान उर्फ़ चिंटू (२१) आणि समीर अमर खान (२०) अशी अटक करण्यात […]
पवई तलावावर जलपर्णींचे साम्राज्य; सहा महिन्यांपासून स्वच्छता नाही
कंत्राटदाराची नेमणूक करणे बाकी असल्यामुळे मुंबईतील लोकप्रिय पर्यटन स्थळ असणाऱ्या पवई तलावाला सहा महिन्यांपासून साफ केले गेले नाही. जर लवकरात लवकर जलपर्णीना काढून टाकले नाही तर लवकरच तलावाचा संपूर्ण पृष्ठभाग व्यापला जाईल अशी चिंता पर्यावरण प्रेमी व्यक्त करत आहेत. मुंबईचे वैभव असणारा पवई तलाव दिवसेंदिवस नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. याची पाणी साठवण्याची क्षमता हळू हळू […]
संघर्षनगरमध्ये सांडपाण्यात धुतल्या जातात भाज्या; नागरिकांच्या आरोग्याशी खेळ
संघर्षनगरमधील लोकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या भाजीवाल्याला मनसेने शिकवला धडा चांदिवली, संघर्षनगर येथे गटाराच्या पाण्यात भाज्या धुवून त्या विक्रीस ठेवल्या जात असल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी समोर आला आहे. येथील एका भाजीवाल्याचा लोकांच्या आरोग्याशी खेळण्याचा जीवघेणा प्रकार मनसे सैनिकांनी उघडकीस आणला आहे. संघर्षनगर येथील इमारत क्रमांक ११ येथे भाजी विक्री करणारा एक भाजी विक्रेता गटारात जाणाऱ्या सांडपाण्यात भाज्या […]
स्टाफ सिलेक्शन परीक्षेत कॉपी करणाऱ्या ११ जणांना पवईत अटक
पवईतील ऑरेम आयटी पार्क, या ऑनलाईन एक्झाम सेंटरमध्ये मंगळवारी स्टाफ सिलेक्शन परीक्षेत इलेक्ट्रिक यंत्रांच्या साहय्याने कॉपी करणाऱ्या ११ जणांना पवई पोलिसांनी अटक केली आहे. कॉपी करण्यासाठी ब्लूटूथ, कॉलर डीवायस आणि मायक्रोफोनचा वापर करण्यात येत होता. सेंटरवर असणाऱ्या दक्ष अधिकाऱ्यामुळे हे प्रकरण उघडकीस आले. महाराष्ट्र विद्यापीठ व बोर्ड परीक्षांमधील गैरवर्तन प्रतिबंधक अधिनियम १९८२ अन्वये कलम ७ […]
इराणी टोळीच्या सदस्याला आंबिवलीतून अटक; साकीनाका, पवई पोलिसांची संयुक्त कारवाई
पवई, साकीनाका भागात सीबीआय ऑफिसर आणि पोलीस असल्याची बतावणी करून नागरिकांना गंडा घालणाऱ्या इराणी टोळीच्या एका सदस्याला कल्याणमधील आंबिवली परिसरातून पोलिसांनी अटक केली आहे. जाफर अली असिफ अली सय्यद (३६) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. साकीनाका आणि पवई पोलिसांनी संयुक्त कारवाई करत त्याला अटक केली. त्याच्या इतर साथीदारांचा पोलीस शोध घेत आहेत. आम्ही […]
मुसळधार : पवई, चांदिवली भागात काय घडले?
विहार तलाव भरला मुंबईला पाणीपुरवठा करणारा विहार तलाव ओसंडून वाहू लागला आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या हद्दीत असलेला विहार तलाव बुधवारी रात्री ९ वाजून १५ मिनिटांनी पूर्ण भरून वाहू लागला असल्याची माहिती पालिकेकडून देण्यात आली. मुंबई, ठाणे भागात दमदार पाऊस होत असल्याने मुंबईला पाणीपुरवठा करणारा विहार तलाव भरून वाहू लागला आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात […]
उद्या, ५ ऑगस्टला मुंबईतील शाळांना सुट्टी
उद्या ५ ऑगस्टला मुंबईतील शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर. मुंबई शहर, मुंबई उपनगर, पालघर, ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील शाळा व कॉलेजना उद्या सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. हवामान विभागाने पुढील ४८ तासांमध्ये अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. जे पाहता शाळा, महाविद्यालयांना सुट्टी देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. शासकीय कार्यालयात कामावर येणाऱ्या कर्मचाऱ्यांना पोहोचण्यास विलंब झाल्यास उशीरा […]
चांदिवलीत भिंत कोसळून एकाचा मृत्यू, दोन जखमी
आज (शुक्रवार, ०२ ऑगस्ट) चांदिवली येथील चांदिवली फार्म रोडवर म्हाडा कॉलोनीजवळ असणाऱ्या एका चाळीतील घराची भिंत कोसळल्याने एका ४० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला असल्याची घटना घडली. या घटनेत अजून दोन व्यक्ती जखमी झाल्या असून, त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. चंद्रकांत मुन्नाप्पा शेट्टी (४०) असे या घटनेत मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव असून, संदीप कदम (३५) […]
९ हजारांच्या परताव्याच्या नावाखाली ठगाने बँक खात्यातून सव्वा लाख उडवले
परदेश वारीच्या वेळी केलेल्या नाश्त्याचे नऊ हजार रुपये ट्रव्हल एजेन्सीकडून परत मिळविण्याच्या नादात एका गृहिणीला सव्वा लाख रुपयाचा ऑनलाईन गंडा घालण्यात आला आहे. पवई पोलीस ठाण्यात यासंदर्भात फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पवई पोलीस ठाणे हद्दीत राहणाऱ्या ३९ वर्षीय तक्रारदार गृहिणीने मार्च महिन्यात पर्यटन सुविधा देणाऱ्या एका नामांकित कंपनीच्या वेबसाईटवरून सिंगापूर येथे फिरण्यास जाण्यासाठी […]
अभिनेता जितेंद्र जोशींनी व्हिडीओ ट्विट करून केली पवईतील बेशिस्त वाहनचालकांची तक्रार
वाहतूकीच्या नियमांची पायमल्ली करणारे मुंबईत पदोपदी पहायला मिळतात. मात्र त्यांच्या या कृत्यामुळे इतर प्रवाशांना नाहक त्रास होत असतो याचे मात्र त्यांना भान नसते. अशाच प्रकारे पवई येथील जलवायू विहार भागात रस्त्यांवर वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली करणाऱ्या वाहनचालकांचा व्हिडीओ पवईकर अभिनेते जितेंद्र जोशी यांनी मुंबई पोलीस यांना ट्विट करत तक्रार केली आहे. ट्विटमध्ये त्यांनी मुंबई वाहतूक पोलीस […]
आयआयटी पवईच्या क्लासरूममध्ये भटक्या गाईचा फेरफटका
आयआयटी बॉम्बेच्या पवई येथील कॅम्पसमध्ये बैलांच्या जोडीने धावपळ करताना एका इंटर्नला जखमी केल्याची घटना अजून ताजी असतानाच, येथील एका क्लासरूममध्ये भटकी गाई घुसल्याचा प्रकार नुकताच समोर आला आहे. भटकी जनावरे येथील विद्यार्थ्यांना त्रासदायक ठरत असतानाच त्यांच्या निवाऱ्याची सोय करण्यात प्रशासन गुंतले असल्याची खंत विद्यार्थी व्यक्त करत आहेत. एका क्लासरूममध्ये लेक्चर सुरु असताना एक गाय त्या […]
जेव्हीएलआरवरील खड्यामुळे अपघात घडून मोटारसायकल चालक जखमी
जोगेश्वरी विक्रोळी लिंकरोडवर खड्यात अडकून एक मुंबईकर गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी पवई परिसरात घडली. प्रसाद मेस्त्री असे जखमी मुंबईकराचे नाव असून, त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून प्रशासनाकडे आपली ही व्यथा मांडली आहे. या संदर्भात महानगरपालिका एस विभागाने उत्तर देताना आम्ही संबंधित विभागाला आपली तक्रार देवू असे उत्तर दिले. पावसाळा आणि रोडवरील खड्डे हे गणित मुंबईकरांना काही […]
गांधीनगर उड्डाणपुलावर कंटेनर पलटला, जेव्हीएलआरवर दोन तास वाहतूक कोंडी
आज (शुक्रवार) सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास गांधीनगर येथील उड्डाणपुलावर कचरा घेवून जाणारा कंटेनर पलटी झाल्याची घटना घडली. पवईकडून पूर्व धृतगती मार्गाकडे जाणाऱ्या मार्गावर हा कंटेनर पलटी होत रस्त्यावर आडवा झाल्याने उड्डाणपुलावरील वाहतूक रोखण्यात आली होती. पुलाच्या खालून वाहतूक वळवल्याने जवळपास २ तास वाहतूक विस्कळीत झाली होती. अखेर क्रेनच्या मदतीने कंटेनर हटवल्यानंतर दुपारच्या आसपास वाहतूक सुरळीत […]
पवईत शालेय वेळेत शाळेजवळ वाहने पार्क करताय? सावधान ! भरावा लागू शकतो ५००० रुपयांचा दंड
साकीनाका वाहतूक विभागाकडून गुरुवारी शाळेजवळ आणि मुख्य रस्त्यांवर पार्क गाड्यांवर करण्यात आली कारवाई. दुपारी १२ ते १ वेळेत शाळेजवळ आणि त्याच्या मुख्य रस्त्यांवर नो पार्किंग’. पवई भागात सध्या वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. अशात शालेय वेळेत पालक, शालेय विद्यार्थ्यांना घेवून येणारी खाजगी वाहने रस्त्यांवर पार्क केल्याने वाहतूक कोंडी जास्तच वाढत असते. या समस्येवर […]

