पवईत तरुणांचा आक्रोश मोर्चा

नांदेड जिल्ह्यात अक्षय भालेराव या तरुणाच्या झालेल्या निर्घुण हत्येच्या निषेर्धात तसेच मुंबई येथे तरुणीचा छळ करून तिची हत्या करण्यात आल्याच्या निषेर्धात पवईमध्ये रविवारी, १८ जूनला तरुणाईच्यावतीने आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात हजारोच्या संख्येने लोक सहभागी झाले होते.

भन्ते शिलबोधी आणि भिख्खू संघाच्या नेतृत्वात पवईतील फिल्टरपाडा येथून पवई पोलीस ठाणे पर्यंत हा आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. पवईतील विविध आंबेडकरी संघटना, पक्षातील तरुण – तरुणी आणि महिला मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी झाले होते. पोलिसांना मागणीचे निवेदन देवून या मोर्चाचा समारोप करण्यात आला.

महापुरूषाची जयंती गावात साजरी केल्याचा राग मनात धरून नांदेड येथे अक्षय भालेराव या तरूणाची हत्या करण्यात आली आहे. मात्र प्रशासन आणि शासन चालढकल करत याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत या घटनेचा आंबेडकरी समाजात तीव्र संताप व्यक्त होत आहे. याचे पडसाद मुंबईतील पवईमध्ये रविवारी उमटलेले पाहायला मिळाले.

अक्षय भालेराव याच्या कुटुंबांला न्याय मिळावा, शासकीय मदत मिळावी आणि आरोपींना कडक शिक्षा व्हावी अशा मागण्या घेवून पवई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बुधान सावंत यांना तरुणांच्यावतीने निवेदन देवून या मोर्चाचा समारोप करण्यात आला.

, , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!