चांदिवली परिसरातील नागरी समस्यांकडे प्रशासन आणि लोकप्रतिनिधी करत असलेल्या टोलवाटोलवी आणि निष्काळजीपणा विरोधात चांदिवलीकर आक्रमक झाले असून, याचा निषेध व्यक्त करण्यासाठी शांततापूर्ण मोर्चा काढण्यात येणार आहे. १२ फेब्रूवारीला चांदिवली येथील नहार अम्रित शक्ती येथून, सकाळी ११ वाजता या शांतता मोर्चाची सुरुवात होईल. चांदिवली सिटीझन वेल्फेअर असोसिअशनच्या नेतृत्वात या मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. पवईचा धाकटा […]


















